*स्पर्धेसाठी*
*नमन शूरवीरा*
भेद माणसांनी, माणसांचेच केले
लुटने अनेकांचे मातीत ओशाळले
माणसांपेक्षाही देव भलतेच झाले
आणि माणसांचे जगणे कठीण झाले
श्रध्दा गेली तळाला, वाढ अंधश्रध्देची
अन जन सामान्यांचे पोट सपाट झाले
काळ हा असा झाला दुष्काळी सदाचा
कष्टक-यांच्या घामाचे थेंब जागीच विरले
ध्यास जिजाऊचा, अन शिवबा तेज झाला
मावळे सोबत घेऊन, स्वराज्यास स्थापिले...
©सोमनाथ पुरी
वसमत जि. हिंगोली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा