शनिवार, १४ मार्च, २०२०

पानगळ

*स्पर्धेसाठी*
*पानगळ*

पानगळ असते वृक्षांची तसेच मनाची
ऋतू येतात आणि जातात झाडे झडली
तरी मनाचे सौंदर्य झडत नसते आणि 
झडलेलं मन ऋतू नूसार दरवळत नसते.

निसर्गाचे व मानवाचे अतूट नाते असते
पण मानवाला बुध्दीचे वरदान असते
म्हणून मानव फुलवतो हवा तेंव्हा स्वतःचा निसर्ग 
ज्याला नसते बंधन निसर्गाचे आणि ऋतूचे

कर्माच्या आणि बुध्दीच्या आधारे मानवास
निसर्ग फुलवता येतो हवा तेंव्हा आनंद घेता येतो
सकारात्मक दृष्टिकोन माणवाच्या उच्च संस्कृतीचे
निर्माण करतो हवा तेंव्हा निसर्ग फुलवतो

होत असतातही निसर्गात बदल 
माणवाला मोहून टाकणारे येतात बादल
निसर्गात हरवणे हि मानवाची प्रवृत्ती 
व स्वतःचा निसर्ग निर्माण करणे ही संस्कृती 

*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा