नीळे सावळे घन नभी
डोकावून गेले गगनी
बरसून कण जलाचे
शहारुन गेले तनमनी
पेरीत गेलो अत्तर मनातले
सुगंधही थोडा दरवळला
उडून गेला तो वा-यावरती
नभातील चंद्रही मावळला
एक वीज कोसळली
ध्यानी मनी नसताना
छेद हृदयी देऊन गेली
काहीच चूक नसताना
कुंडलीतही होता मंगळ
स्वभावही जुळले नाही
चंद्र आणि वसुंधरेतील
अंतर काही मिटले नाही
तनात भिंगरी मनात भिंगरी
स्थिर कसा भाव व्हावा
येणे जाणे गुणधर्म मूळीचा
एकच कसा गाव रहावा
- सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा